Total Pageviews

Friday, December 21, 2012

एचटीसी स्मार्टफोनमध्ये आता मराठीही


- वृत्तसंस्था
Tuesday, July 17, 2012
नवी दिल्ली - स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल उत्पादनात आघाडीवर असलेल्या एचटीसी कंपनीने त्यांच्या अँड्रॉईड प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये आता भारतीय भाषांची जोड दिली आहे. त्याशिवाय सॅमसंग कंपनीच्या बहुचर्चित गॅलेक्सी नोटची पुढची आवृत्ती गॅलेक्सी नोट-२ येत्या ऑगस्टमध्ये बाजारपेठेत येऊन धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एटटीसीच्या यापुढे बाजारात येणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये हिंदी, तमिळ, बंगाली आणि मराठी भाषांची जोड देण्यात येणार आहे. या भाषांमुळे ग्राहकांना या भाषेत एसएमएस किंवा मेल वाचता आणि लिहिता येणार आहेत. चालू वर्षी या कंपनीचे स्मार्टफोन विकत घेतलेल्या विद्यमान ग्राहकांनाही या भाषा कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भाषांचा पॅक गूगल प्लेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे कंपनीचे भारतातील व्यवस्थापक फैसल सिद्दिकी यांनी सांगितले.

एचटीसी कंपनीने आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत एचटीसी वन एक्स, एचटीसी वन एस, एचटीसी वन व्ही, डिझायर सी आणि डिझायर व्ही हे स्मार्टफोन्स आणले आहेत. एचटीसी एक्स्प्लोरर आयएस क्यू ४ हा स्मार्टफोन बाजारात आणताना, लवकरच आपल्या फोन्समध्ये भारतीय भाषांचीही जोड देण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने केली होती. हे आश्वासन कंपनीने आता पूर्ण केले आहे.


एचटीसी वन आणि डिझायर मालिकेतील सर्व स्मार्टफोन्ससाठी कंपनीतर्फे लवकरच सॉफ्टवेअर अपडेट देण्यात येणार आहे. या अपडेटमध्ये हिंदी, मराठी आणि तमिळ भाषा असतील. त्याशिवाय येत्या ऑगस्टमध्ये बंगाली भाषा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ( सकाळमधून)

                                                                                                         Posted By
                                                                                                         ni3more

Wednesday, December 19, 2012

आयबॉलच्या 'अँडी'चा नवा अवतार



 मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या आयबॉल  अँडीचा नवा अवतार बाजारात आणला आहे. अधिक वेगवान आणि आत्याधुनिक वैशिष्टयांचा समावेश असलेला  अँडी ४.५ एचमध्ये एचडी डिस्प्ले आहे. तसेच ड्युअल कोअर प्रोसेसर आणि १ जीबी रॅमचा यामध्ये समावेश आहे. केवल ९.९ एमएम पातळ असलेल्या या मोबाईल मध्ये ८ मेगापिव्सल कॅमेरा आणि थ्रीजी व्हीडिओ कॉलिंगही करता येऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे . 

                                                                                                                    Posted By
                                                                                                                     ni3more

Tuesday, December 18, 2012

आयफोन की अँड्रॉइड


नवीन मोबाइल घेताना नेहमी प्रश्न पडतो कोणता घ्यावा ? अँड्रॉइड की आयफोन ? त्यातही महागडा फोन घ्यायचा तर गोंधळ आणखीनच वाढतो . सॅमसंग गॅलक्सी एस ३ आणि आयफोन पैकी कशाची निवड करावी ते कळतच नाही . दोन्ही त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहेत , पण मग निवड कशी करायची ? तेव्हा निवड करताना सर्वात आधी पहा ते तुमचा मोबाइल ऑपरेटर . तसेच तुमच्या गरजेच्या अॅप्स आणि इतर गोष्टी कुठे आहेत तेही पहा . कारण एकदा का खरेदी झाली की स्विच करणे आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने त्रासदायक असते

आयफोन

मोठ्या प्रमाणात चांगल्या अॅप्सची उपलब्धता हे आयफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . अॅपलच्या अॅप स्टोअरवर ७ लाखाहून अधिक अॅप्स उपलब्ध आहेत . ब - याचशा प्रस्थापित कंपन्या सुरुवातीला आयफोनसाठी अॅप बनवतात नंतर अँड्रॉइडसाठी . कितीतरी काळ इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच उपलब्ध होतं . फेसबुकनेही त्यांचं नवीन अॅप सुरुवातीला फक्त आयफोनसाठी उपलब्ध करून दिलं नंतर अँड्रॉइडसाठी . ट्विटर आणि फेसबुकचे आयफोन अॅप अतिशय उत्तम आहेत . त्यामुळे पोस्ट टाकणं अगदीच सहज होतं . पासबुकसारखी काही आयफोनसाठीच बनविलेली अॅपही याठिकाणी आहेत . मोबाइल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्क्वेअर कंपनीने त्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे . याच्या सेटअपसाठी खूप वेळ लागत असला तरी फायदेही आहेतच . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अॅपलच्या सिस्टीममध्ये उदा . की - बोर्ड बदलण्यासारखे फारसे बदल करू शकत नाहीत . त्यामुळे टेक सॅव्ही नसलेल्या किंवा ज्यांना फारसे बदल करायचे नसतील त्यांना याचा फायदा होतो .

अँड्रॉइड

अँड्रॉइडचा सर्वात मोठा प्लसपॉइंट म्हणजे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले मोबाइल्स . सँमसंग , एलजी , मायक्रोमॅक्सपासून कितीतरी कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत . अगदी गुगलचा नेक्ससही तुमच्यासाठी हजर आहे . अँड्रॉइडचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे , तुम्हाला गरजेप्रमाणे यात बदल करता येतात . उदा . स्विफ्ट की हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले एक आघाडीचे अॅप आहे . यात तुम्ही गरजेप्रमाणे की - बोर्ड बदलू शकता किंवा तुम्ही कोणता शब्द टाइप करणार याचा अंदाज हे सॉफ्टवेअर व्यक्त करते . त्यातून टायपिंग जलद होऊ शकते . आणखी एक गोष्ट म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्स . अॅपल अॅप्स ही डेव्हलपरची पहिली पसंत असली तरी कित्येक अॅप्सला अॅपल मंजुरीच देत नाही . गुगलचं तसं नाही . त्यामुळे गुगलवरही जवळपास ७ लाख अॅप्स आहेत . विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी हे देखील काही पर्याय आहेत . पण त्यांना अँड्रॉइड किंवा आयफोन इतक्या अॅप्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल . (मटावरून).

                                                                                                            Posted By 
                                                                                                             ni3more

Monday, December 17, 2012

नरवीर चिमाजी अप्पा पुण्यतिथी

नरवीर चिमाजी अप्पा 


                                                               
                                                               किल्ले वसई सफर 
                आपल्या वसईला म्हणजे शूर्पारक नगरीला पौराणिक काळापासून ते ब्रिटीश काळापासून असा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
उत्तरेकडे वैतरणा दक्षिणेला उल्हास नदी तसेच पूर्वेला तुंग पर्वत व पश्चिमेला विशाल समुद्र ह्यामुळे वसईला भौगोलिक दृष्टीने खूपच महत्व प्राप्त झाले होते.
अनेक तीर्थक्षेत्र , तलाव, बावखले ह्यांनी वसईची जमीन खूपच सुपीक होती. आशियातील सर्वोत्तम प्रतीची साखर आपल्या वसई मध्ये बनत असे.
शूर्पारक बंदरातून अखाती देशांशी इथे मिळणारे मसाले, साखर ह्या सारख्या अनेक उत्पादनांचा व्यापार चालत असे. बोट बांधणी साठी शूर्पारक फारच प्रसिद्ध होते.
किंबहुना म्हणूनच अनेक परकीय आक्रमण इथे झाली. ई.स. १५१५ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी ह्या भूमीत पाऊल ठेवले त्यानंतर ई.स. १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांनी तीन वर्षे झुंज देऊन पोर्तुगीजांना परास्त केले व वसई परकीय सत्तेपासून मुक्त केली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर पारंपारिक शास्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा होता.
युरोपीय सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसई मध्ये झाला ह्याचा वसई करांना सार्थ अभिमान वाटायला हवा. परंतु ह्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा आपला वसईचा किल्ला, अनेक महत्वाचा ऐतिहासिक वास्तू मात्र उपेक्षित अवस्थेत आहेत. वसईतील सुशिक्षित युवा वर्ग हा उपजीविकेसाठी रोज मुंबई व उपनगरांमध्ये प्रवास करत असतो ह्या धकाधकीच्या जीवनात ह्या सार्यांचा विसर पडत चालला आहे. पण तरीही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहणाऱ्या अनेक युवकांनी एकत्र येऊन आपल्या वसईचे ऐतिहासिक महत्त्व जाणून आपल्या अस्तित्व आणि आदर्शाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या नरवीर चिमाजी अप्पा व २२००० शहीद मराठा सैन्याला आदरांजली देण्यासाठी...हि स्फूर्ती यात्रा काल काढली होती.
होय स्फूर्ती यात्राच कारण इथून पुढे आपल्याला लढाचय ते वसईतील निसर्ग समृद्धी जपण्यासाठी... अनेक तलाव बावखले, हिरव्यागार पानफुलांच्या वाड्या आता नसता होत चालल्या आहेत... ते वैभव जपण्यासाठी मोहीम हाती घ्यायची आहे म्हणून हि स्फूर्ती यात्रा काल निघाली होती!!!    
                  आज चिमाजी अप्पाची आज १७ डिसेंबर २०१२  पुण्यतिथी असल्याने काल दिनांक १८ डिसेंबर २०१२ रोजी चिमाजी अप्पाच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी आणि वसई किल्ला जिंकताना चिमाजी अप्पानी   किती महत्व पूर्ण भूमिका निभावली होती आणि मराठ्यांचा इतिहास कळण्यासाठी फेसबुक वरील वसई लाईव ह्या ग्रुप ने पुढकार घेवून हि यात्रा आयोजित केली होती ह्या यात्रेत मी आणि माझ्या मित्रांनी आवर्जून हजेरी लावली. हि यात्रा सकाळी ८ वाजता चिमाजी अप्पा स्मारकापासून पासून सुरुवात झाली. सर्वात पहिला चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन मग हि यात्रा पुढे सरकत गेली. जवळ जवळ शंभर ते दीडशे इतिहास प्रेमींनी ह्या यात्रे मध्ये सहभाग घेतला होता.ह्या यात्रे मध्ये चिमाजी अप्पांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कसा हा किल्ला काबीज केला आणि आपल्या पराक्रमाची शिकस्त कशी दिली पोर्तुगीजांना त्याची इत्त्म्भूत माहिती देण्यात आली.


                                                                                                    Posted By
                                                                                                     ni3more

Wednesday, December 12, 2012

१२ १२ १२.....

              

                हजार वर्षातून आला तो दिन 
                                                                     १२ १२ १२  !!!
                                                                जगण्याच्या वाटेवरती 
                                                             तारेवरची कसरत करताना 
                                                                    वाजले आपले 
                                                                    १२ १२ १२  !!!
                                                            या दिवसाचे औचित्य साधुनी 
                                                                 दिवस साजरा करूया 
                                                                       १२ १२ १२  !!!
                                                               ऐक मुखाने शपथ घेवूया
                                                               जगण्याच्या या वाटेवरती
                                                                आयुष्य हे निर्मल बनवूया 
                                                                   प्रगतीची ह्या वाटेवरती 
                                                                  बाराचे हे निमित्त साधुनी 
                                                                      साजरा करूया दिन 
                                                                          १२ १२ १२  !!!


                                                                                                                       Posted By
                                                                                                                         ni3more

                                       

Tuesday, December 11, 2012

१२-१२-१२ एक खास दिवस!


या वर्षी आलेली १२-१२-१२ ही एक क्वचितच येणारी तारीख आहे. पुन्हा अशी तारीख येण्यास एक हजार वर्षे उलटावी लागतील. यावर्षी १२ ही संख्या एकाच दिवशी तीन वेळा येत असल्याने या दिवसावर १२ या संख्येचाच प्रभाव राहील. समान अंकी तारखा या क्वचितच येतात आणि म्हणूनच ते दिवस काही खास वैशिष्ट्ये होऊन येतात. या दिवसाचे महत्त्व काय आहे ते जाणून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.

१२ या संख्येला आपल्याकडे अतिशय महत्त्व आहे. मूल जन्माला आले की १२ व्या दिवशी बारसे करतात व माणसाच्या मृत्यूनंतरही १२ व्या दिवशी बरेच विधी केले जातात. १२ तास झाले की अर्धा दिवस संपतो त्याचप्रमाणे वर्षाचे १२ महिने हा कालगणनेचा महत्वाचा टप्पा आहे. आपल्या शास्त्रकारांनी संपूर्ण मानव जातीला १२ राशींमध्ये समाविष्ट केले आहे. धार्मिक दृष्टीकोनातून भगवान शंकराची १२ ज्योर्तिलिंगे प्रसिद्ध आहेत. १२ हा अंक पूर्णत्वाकडे नेण्याचा संकेत देतो. उदा. १२ महिने झाल्यावर १ वर्ष संपते, १२ वाजल्यावर १ दिवस संपतो वा सुरू होतो. दुपारचे १२ हे अर्धा दिवस निश्‍चित संपल्याची खूण असते.एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे १२ वाजले म्हणजे त्याचा सत्यानाश झाला किंवा सर्व संपले असा अर्थ होतो. त्या अर्थाने १२ वाजले हा शब्दप्रयोग आपल्याला परिचित आहेच.
माझ्या अनेक वर्षांच्या ज्योतिष विषयक आणि इतर संशोधनातून माझे असे मत आहे की, १२ ही संख्या राहूच्या अमलाखाली येते. माझ्यामते राहू हा कर्म स्थानाचा मालक आहे आणि त्यामुळे तुम्हाला मिळालेले आशीर्वाद आणि शाप जे भूतकाळात घडून गेलेले असतात त्याचा परिणाम तुम्हाला वर्तमान काळातही जाणवतो. माणसाचे अंतर्मन साठवलेले असते आपण रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ करतो, कपडे धुतो परंतु आपले मन स्वच्छ करत नाही. १२-१२-१२ या दिवशी सकाळी उठून आपण जर आपल्या अंर्तमनात साचलेली घाण, भूतकाळातील जळमटे काढून टाकली आणि अंतर्मनातील नकारात्मकता (निगेटीव्हीटी) काढून जर सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला तर आपला फायदा होईल. कपडे धुण्यासाठी जरी वॉशिंग मशीन असले तरी मन धुण्यासाठी अद्याप मशीन निघालेली नाही. त्यामुळे हा प्रयत्न स्वत:लाच करावा लागेल. 
ज्यांना शत्रूवर विजय मिळवायचा आहे व ज्यांच्या पत्रिकेत राहू अतिशय प्रभावशाली आहे त्यांनी या दिवशी शत्रू निर्मूलनासाठी योजना आखल्यास त्याचा फायदा होईल. ज्यांच्या पत्रिकेत राहू हा सकारात्मक आहे त्यांच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टींचे नियोजन करणे हे अनेक पटीने फायद्याचे होऊ शकते.
या दिवसाचा फायदा घेऊन अनेक लोकांनी आपल्या व्यवसायाची सुरूवात, नवीन जागांचे उद््घाटन तसेच लग्न करणे इ. कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र या दिवशी सुरू केलेल्या उपक्रमांचा आपल्याला फायदा होईल की तोटा, हे आपल्या पत्रिकेतील किंवा हातावरील राहूची स्थिती कशी आहे? यावर अवलंबून आहे. यासाठी जाणकारांकडून जरूर ते मार्गदर्शन घेतल्यास बरे होईल. ज्या गोष्टींना आपण शापित किंवा अशुभ म्हणतो त्यावरही १२ या अंकाचा आणि राहू या ग्रहाचा प्रभाव असतो. अशा वास्तू आणि तुमचे अंतर्मन शुद्ध करण्यासाठी हा दिवस उपयुक्त आहे. आपले वर्तमान आणि भविष्य अधिक सुकर करण्यासाठी वाचकांनी असा प्रयत्न अवश्य करावा.
                                             - शीला तासगावकर, ज्योतिष अभ्यासक

                                                                                            (लोकमतवरून)



Monday, December 10, 2012

आता, मोबाईल वरून पाठवण्याद्वात येणाऱ्या एसमएस लेन्स रे वाचू शकतो.


Subject : Science & Technology.

Now, SMSs can be projected on your contact lens
PTI | Dec 10, 2012, 05.53 AM IST

LONDON: Scientists have developed a new technology that allows electronic messages sent from mobile phones to be directly projected on to contact lens placed in the recipient's eyes. 

The technology, developed by Belgian researchers, allows information such as text messages from a mobile phone to the contact lenses. 

Ghent University's centre of micro-systems technology developed the spherical curved LCD display which can be embedded in contact lenses and handle projected images using wireless technology, The Telegraph reported. 

The new technology allows the whole curved surface of the lens to be used, unlike previous contact lens displays, which are limited to a few small pixels to make up an image. One application suggested by the researchers is a "one pixel, fully covered contact lens acting as adaptable sunglasses" . 

"This will never replace the cinema screen for films. But for specific applications it may be interesting to show images such as road directions or projecting text messages from our smart phones straight to our eye," said professor Herbert De Smet. 

आता, मोबाईल वरून पाठवण्यात येणाऱ्या एसमएस लेन्स द्वारे वाचू शकतो.

लंडन : तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज काही होईल ह्याचा काही नेम नाही. ह्याच क्षेत्रात संशोधकांनी एक पाऊल पुढे ठेवत एक शोध लावला आहे. डोळ्यात लावण्यात येणाऱ्या लेन्स द्वारेच मोबाईल वरून पाठवण्यात येणाऱ्या एसमएस वाचू  शकणार आहे.
हे  तंत्रज्ञान  बेल्जियमच्या संशोधकांनी शोधले असून मोबाईल वरून पाठवलेले मेसेज थेट कॉन्टॅक्ट लेन्सवर पाहता येतात.घेंट विद्यापीठाच्या सेंटर ऑफ मायक्रो सिस्टीम टेक्नॉलॉजीने अर्धवर्तुळाकारएलसीडी डिस्प्ले तयार केला असून तो कॉन्टॅक्ट लेन्समध्ये बसविता येतो आणि वायरलेस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर इमेज दिसतात.
या नव्या तंत्र ज्ञाना मध्ये अर्धवर्तुळाकारएलसीडी डिस्प्ले हा  त्यामागील कॉन्टॅक्ट लेन्ससचा डिस्प्ले  लहान आकाराची इमेज बनवण्यासाठी सीमित आहे.सिनेमासाठी त्याचा पर्याय कधीच होऊ शकत नाही.  प्रोफेसर हर्बर्ट दे स्मार्ट यांच्या मते विशिष्ठ प्रयोगासाठी काही इमेज रस्त्याच्या दिशेने आपल्या स्मार्ट फोन मधून सीधा आपल्या डोळ्यांसमोर संदेश द्वारे आपल्या समोर परिवर्तीत होतील.


                                                                                                  Posted By
                                                                                                    ni3more


Tuesday, November 27, 2012

वाघा ' चं बुलंद आयुष्य



ऐसा माणूस (नेता) होणे शक्य नाही!!!

' वाघा ' चं बुलंद आयुष्य

२३ जानेवारी १९२६ - जन्म

१४ जून , १९४८ - सरला वैद्य ( मीनाताई ) यांच्याशी विवाह .

१९५० - ' फ्री प्रेस जर्नल ' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रूजू

१३ ऑगस्ट १९६० - ' मार्मिक ' हे मराठीतील पहिले व्यंगचित्रसाप्ताहिक सुरू . वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ' मार्मिक ' हेनाव सुचवले .

१९ जून १९६६ - ' शिवसेना ' पक्षाची स्थापना . ( हे नावहीप्रबोधनकारांनीच सुचवले .)

३० ऑक्टोबर १९६६ - शिवसेनेचा शिवतीर्थावर ( शिवाजी पार्क) पहिला मेळावा .

१९६८ - शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूकलढवली .

९ ऑगस्ट १९६८ - कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'भारतीय कामगार सेने ' ची स्थापना .

१९७० - शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक

१९७१ - मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पहिले महापौर - डॉ .हेमचंद्र गुप्ते

२० नोव्हेंबर १९७३ - वडील केशव ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचेनिधन .

२३ जानेवारी १९८९ - ' सामना ' हे शिवसेनेचे मुखपत्र सुरू .

१९८९ - शिवसेनेचे पहिले खासदार वामनराव महाडिक

१९९५ - शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रातस्थापन . मनोहर जोशी पहिले मुख्यमंत्री

फेब्रुवारी १९९६ - डॉ . नीतू मांडके यांनी बाळासाहेबांवरबायपास सर्जरी केली .

२० एप्रिल १९९६ - मोठे पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे अपघातीनिधन .

सप्टेंबर १९९६ - पत्नी मीनाताई ठाकरे यांचे हृदयविकारानेनिधन .

१९९९ - बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाने ११डिसेंबर १९९ ते १० डिसेंबर २००५ ही सहा वर्षे मतदानकरण्यास बंदी घातली .

२००३ - महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरेयांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी बहाल .

९ मार्च २००६ - पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडूनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली .

१७ ऑक्टोबर २०१० - युवा सेनेची स्थापना . नातू आदित्यठाकरेकडे नेतृत्वाची धुरा .

२४ ऑक्टोबर २०१२ - उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनासांभाळून घेण्याचे दसरा मेळाव्यात चित्रफितीद्वारे भावनिकआवाहन . शेवटचे भाषण

१७ नोव्हेंबर २०१२ - एका युगाचा अंत

                                                                                                          -ni3more

Sunday, November 18, 2012

श्रद्धांजली एकामहापुरुषाला !!!

                         बाळासाहेब ठाकरे   
                           (1926-2012)
                      

   



                                    ऐसा माणूस (नेता) होणे शक्य नाही!!!


                                                    अखेरचा हा तुला दंडवत , सोडून जातो गाव 
                                                     दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव 

                                                   तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले 
                                                   आता हे परी सारे सरले, उरले मग नाव 

                                                   हे सोडून जाते आता, ओढून नेली जैसी सीता 
                                                   कुणी न उरला वाली आता, धरती दे ग धाव 

                                                          अखेरचा हा तुला दंडवत
                                                                 तुला दंडवत!!!


                                                                                                               ni3more



Monday, November 5, 2012

विषय- इलेक्ट्रोनिक मिडिया व रिपोर्टिंग


   Date : ४/१०/२०१२                                                          व्याख्याता  : शशिकांत सांडभोर .


इलेक्ट्रोनिक मिडिया दोन प्रकारे काम केले जाते
१. BBC  २. CNN

इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना patience असले पाहिजे. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना दोन बंधन पाळले जाते एक म्हणजे जास्तीत जास्त ऐकावे आणि दुसरे म्हणजे लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधा. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये रिपोर्टिंग करताना कोणाचेही अनुकरण करू नये आणि आपली स्वतःची बोलण्याची style असली पाहिजे.
चॅनल मध्ये दोन आउट पुट्स असतात 1. इनपुट 2. आउटपुट  जिथे आपल्याला बातमी करायची आहे आणि जिथे स्टोरी आइडिया आणि बातमीची विषमता किवा विश्वासहरता असते तिथे बातमी होते. इलेक्ट्रोनिक मिडिया हे चोवीस तासाचे राक्षस आहे त्याला काहीना काही सारखा खायला द्यावे लागता त्यासाठी कोणत्या बातमी मधून कोणती बातमी करायची ह्याचे सेन्स पत्रकाराला असले पाहिजे.

पत्रकारिता करताना पत्रकाराला आवश्यक असणारे गुण
१. पत्रकाराला न्युज सेन्स असला पाहिजे.
२. प्रश्न पडले पाहिजे.
३. पत्रकाराने source दुसर्यांना सांगू नये.
४. चांगला ऐकणारा चांगला पत्रकार होऊ शकतो.
५. professional आणि निर्भीड असले पाहिजे.
६. प्रश्न विचारण्याची पद्धत हि आक्रमक आणि शांत असली पहिजे.
७. पत्रकारिता करत असताना पाय जमिनीवर ठेवा.
८. आपण जी बातमी देणार आहोत त्याचा अभ्यास खोल वर करावा.
९. व्यक्तिमत्व चांगले ठेवा आणि संवाद कौशल्य चांगले ठेवा.


इलेक्ट्रोनिक माध्यमामध्ये मुलाखती घेण्याचे प्रकार सांगितले ते पुढीलप्रमाणे-
phono, one to one, walker, opening p2c, closing p2c, MCR

                                                                                                 ni3more

जाहिरात



Date : 11/09/2012                                                                  व्याख्याता :विजय  पाध्ये.

जाहिरात म्हणजे काय ?

आपण एखादी गोष्ट करून लोकांकडे पोहचवतो तिला 'जाहिरात' असे म्हणतात .
'दवंडी' हि जाहिरातीची पहिली सीडी आहे. जाहिरात म्हणजे आपण जी जाहिरात करून लोकांसमोर सादर करणार आहे तिला जाहिरात बोलतात. जाहिरातीचा पहिल्या मुळा पासून अभ्यास केला तर पहिला जाहिरात हि म्हणजे राजे महाराजांच्या काळात एखादी गोष्टा किवा वार्ता पूर्ण शहरभर आणि पूर्ण पंच कृषित सांगायची असेल तर ती एकाद्या माणसाद्वारे संपूर्ण गावात दवंडी पीटवून सांगितली जात असे जेणे करून राजा चा त्या काळी जो फर्मान असे तो दवंडी मार्फत लोकांकडे पोहोचवला जात असे. नंतर कालांतराने त्या मध्ये बदल होत गेले सुरुवातीला तुतारी नंतर दवंडी पीटवने असे होत असे नंतरच्या काळात wall painting जाहिराती होत असे. नंतर कालांतराने जाहिरात ह्या प्रकारे प्रसिद्ध होऊ लागली रेडीओ, टीवी,glosure , Hordingdz, wall painting ह्या माध्यमातून जाहिरात देण्याचे प्रमाण वाढू लागले. 
जाहिरात करताना पुढील बाबी आवश्यक
जाहिरात करताना copy wirter, art director पाहिजे. तसेच जाहिरात करताना सृजनशीलता, कल्पकता हे महत्वाचे गुण असणे गरजेचे आहे .
लोकसत्तेचा वाचक हा novelty च्या मागे असतो. महाराष्ट्र टाइम्स  हा highly qualifyed असल्या कारणाने त्यांना त्या प्रकारच्या न्युज द्यावी लागतात. तसेच कम्यूनिकेशन  ची साधना जरा चालवायची असेल तर जाहिराती शिवाय पर्याय नाही आहे.  जाहिराती मध्ये इतका स्कोप त्या मध्ये करू तेवढे कमीच.

सर्वात जास्त खपाचे मासिक : मनोरमा मल्याळम.

जाहिरात करताना आपल्या आपण ती लोकांसमोर अशी मांडली पाहिजे कि तुम्हाला ग्राहक हा mouth publicity मधून मिळाला पाहिजे. जाहिरात हे एक असे माध्यम आहे जे तुम्ही काही केलाय ते  लोकांसमोर चांगल्या प्रकारे पोहचले पाहिजे. जाहिरात अशी केली पाहिजे कि ती करताना आपल्याला त्या जाहिरातीतून त्या brand ची loyality जपली पाहिजे आणि त्या साठी जाहिरात अशी बनवावी कि त्यातून लोकांसमोर चांगली जाहिरात समोर देवून त्या brand ची जपणूक करावी लागते. exp: कालनिर्णय, cadbury. कालनिर्णय हि जाहिरात लोकांच्या अशी मनावर बिंबली आहे कि भिंती वर कोणती दिग्दर्शिका पाहिजे तर कालनिर्णय. जाहिराती मध्ये marketing हा मोठा गुरु आहे. कला, व्यवसाय, धंदा, काय आहे जाहिरात आहे. आणि जाहिरात करताना प्रत्येक वेळी positive sense असणे गरजेचे आसते आणि जाहिरात करताना कधीच अडचणी येत नाहीत. आणि जाहिरात करताना ग्राहकांची नीती मूल्याता  जपली पाहिजे.

                                                                                                   Nitin More

विषय : ई - पेपर.

Date : 13/10/2012                                     व्याख्याता : जयकृष्ण नायर आणि प्रमोद गणेशे
ई - पेपर म्हणजे काय?
छापील अंक आहे तसा इंटरनेट वर उपलब्ध करून देणे त्याला ई - पेपर असे म्हणतात. ऑनलाइन न्यूज़ पेपर अथवा वेब न्यूज़ पेपर दैनिकाचा extanded part.
ई - पेपरचे प्रकार
तंत्राद्यानामुळे  ई - पेपर अधिकाधिक चांगला आणि रिदर्ड्स. 
epaper with text and newspaper view lokmat.
Text and image format.
epaper with flick book. 
epaper मध्ये पेपर user friendally ठेवायचा प्रयत्न.

http://epaper.mailtoday.in
http://www.mid-day.com/epaper/
test and newspaper view 

epaper with readout feature (like podeast)
केवळ online epaper 
southportreporter.com

काही उत्तम ई - पेपर 
Times of India 
The Hindu (केवळ डेमो)
Sakal 
Lokmat
Prahaar .

E - paper redars interaction 
Archives Exp : times of india सारखे वृत्तपत्राने The Times of India (11 आवृत्या).
The Economic Times (चार आवृत्या). आणि mirror (चार आवृत्या) या दैनिकांचे अनुक्रमे २००३,२००४, आणि २००५ पासूनचे अंक online उपलब्ध करून दिले आहेत. सर्वसाधारण एक वर्ष ते तीन महिन्या पर्यंतचे अंक उपलब्ध होऊ शकतात.

ई - पेपर साठीचे तंत्रज्ञान (Technology used in epaper)
Technology used for designing and development of epaper is HTML, flash, PHP, MYSQL, ASP,NCT, MS, SQL, JAVA etc.

ई - पेपर आणि लाईव वेबसाइट  ई - पेपर सोबत ताज्या बातम्या प्रहार आणि लोकमत.
ई - पेपर mobile apps 
ई - पेपर मोबाइलवर रीडर्स फ्रेंडली दिसेल यासाठी विशेष  mobile apps .
मोबाइलवर वेगाने डाउनलोड .

२४*७  वेबसाइट असताना ई - पेपरची काय गरज? 
वाचकांची सवय 
वृत्तपत्र वाचण्याचा फिल 
वाचकांच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न.

भविष्यातील ई -  पेपर 
मोबाइलवर सहज आणि वेगाने ओपन होतील.( टेबलेट).

ई - मासिक 
लोकप्रभा (साप्ताहिक)
http://lokprabha.loksatta.com

अनुभव मासिक 
http://www.newseum.org/todaysfrontpages/

काही महत्वाच्या वेबसाइट
http://www.newseum.org/todayfrontpages/
www.epapergallary.com
pressdisplay.com


                                                                                            Nitin More


Friday, October 12, 2012

वाटचाल सह्याद्रीची १९७२ ते २०१२

आपल्याला सर्वाना अगदी परिचयाचे असलेला सहयाद्री वरील लोकमानस हा कार्यक्रम नेहमीच 
वेगवेगळ्या विषयावर आपले कार्यक्रम सादर करीत असतो. मी वेब जर्नलिज़म हा कोर्स करीत असल्याने मला ह्या कार्यक्रमा मध्ये जाण्याचे भाग्य लाभले नवीन अनुभव मिळेल म्हणून मी कार्यक्रमाला गेलो होतो. 
२ ऑक्टोबर २०१२ सह्याद्री वाहिनीला चाळीस वर्ष पूर्ण झाली ह्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०१२ रोजी सह्याद्री लोकमानस ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक जयू भाटकर ह्यांनी १९७२ ते २०१२ सह्याद्रीची वाटचाल हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने पत्रकारितेशी संबधित असणार्या मुला मुलीना बोलावण्यात आले होते. गेले चाळीस वर्ष काम करून निवृत्त झालेल्या आजी माजी कर्मचार्यांना ह्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून 
बोलावले होते. त्यात ज्येष्ट दूरदर्शन अधिकारी डॉ. विश्वास मेहंदळे, याकुब सईद, विनायक चासकर, अशोक दुबे, रविवारचे राजे म्हणून प्रसिद्ध असणारे अरविंद मर्चंड, गुंडाप्पा विश्वनाथ, चिमणराव  अश्या एकामागोमाग प्रसिद्ध कार्यक्रम देणाऱ्या विजया धुमाळे त्या आल्या होत्या. त्याच बरोबर अभियांत्रिक  क्षेत्रातले डी.स.ल प्रसाद, के न सोमनाथ, नीना राऊत, महाराष्ट्राची लोकधारा सारखा प्रसिद्ध कार्यक्रम देणाऱ्या किरण चित्रे, तसेच तुम्हाला आम्हांला अगदी परिचयाचे असणारे सुप्रसिद्ध निवेदक प्रदीप भेंडे, सुधीर गंडगीळ, आणि देवेंद्र भुजबल तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातले आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निवेदिका ह्या समीर जोशी ह्या होत्या. निवेदिका समीर जोशी ह्यांचे सूत्रसंचालन हे तर अवर्णनीय आणि सुंदर होते.  
          डॉ.विश्वास मेहंदळे यांनी आपली आठवण सांगताना त्यांनी  सुभाषिताचा आधार घेऊन आपल्या भावना प्रकट केल्या ते बोलत होते कि नवीन माध्यमांमध्ये काम करताना अनुभव हा भारत दुर्लभे जन्म महाराष्ट्र अति दुर्लभ आमन्त्राम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनवश्यं अयोग्य पुरुष नास्ती. याकूब सईद यांनी पहिल्याच दिवशी पहिला कार्यक्रम कसा आठ मिनिट उशिरा सुरु झाला आणि एक आशा पारेख यांची एक मस्त आठवण सांगून कार्यक्रमामध्ये अजून रंगत आणून दिली. अशोक यांनी सांगितले कि निर्माता म्हणून आम्ही कलाकारांना मोठे केले नाही तर कलाकारांनी दूरदर्शन ला मोठे केले. तसेच त्यादरम्यान सुधीर गंडगीळ यांनी याकूब जिना टाकलेली गुगली ती अशी ह्या कार्यक्रमात बसले असताना तुम्ही तुमच्याच कार्यक्रमाची निर्मिती करीत असताना तुमच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलेले असेल का? बदलेल्या प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन ह्या गुगलीने कार्यक्रमात अजून रंगत आणून सोडली.
अरविंद मर्चंड यांनी हेमा मालिनीची आठवण सांगताना सांगितले आपण आता जसे सह्याद्री वाहिनीला चाळीस वर्ष पूर्ण झाले तसे त्यावेळेला सह्याद्री वाहिनी ला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती म्हणून आम्हाला दिल्लीवरून एक प्रोग्राम करायला सांगितला होता तर त्यावेळी आम्ही हेमा मालिनीला घेवून प्रोग्राम करायचा  ठरवला पण एक अडचण होती त्याकाळात हेमा मालिनी हि प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि आणि मानधन देणे काही परवडणारे नव्हते तर त्यांनी ठरवले कि आपण त्यांना आपला कार्यक्रम करण्यासाठी  विनंती करू आणि हेमा मालिनी बोलल्या  दूरदर्शन हे माध्यम एवढे मोठे आहे आणि आम्हा कलाकारांना मोठे करण्या मागे  त्यांचे हाथ मोठे आहेत  म्हणून  मी मानधन न घेता  कार्यक्रमा मधे सहभागी होईल. तसेच प्रदीप भिडे यांनी मुक्त बर्वे यांनी त्यांना वृत्त वाचनाची संधी कशी दिली आणि त्यांनी १९९३ बॉम्ब  ब्लास्ट  झाले असताना मजलदरमजल करत कसे सह्याद्री मध्ये पोहचले आणि कश्या दोन दिवस बातम्या सांगितल्या त्याचा थरारक  अनुभव सर्वांशी शेअर केला. सुधीर गांडगीळ यांनी सर्व अभियांत्रिक अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली तसेच एक किस्सा सांगताना त्यांनी बाळासाहेब यांच्या एका किस्स्याची आठवण सांगताना सांगितले कि बाळासाहेब आणि व.पु.काळे पंचविशीच्या कार्यक्रमाला आले असताना बाळासाहेब बोलले व पु काळे आणि मी एकाच कॉलोनीत राहत असल्याने दोघांना एकत्र बोलावले आहे का.तसेच सुधीर गांडगीळ यांनी असे  मनोरंजन केले अश्या प्रकारे एक एक किस्से आठवणी कार्यक्रम चालू असताना रंगत गेले. हा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यामागे कारण म्हणजे तेथील टेक्निकल स्टाफ आणि कॅमरमन यांनी त्यावर घेतलेली मेहनत दिसली आणि कार्यक्रम कसा करावा हे सह्याद्री कडून इतर वहिन्यानी शिकले पाहिजे. सह्याद्री हे एक उत्तम उदहारण आजच्या वहिनीच्या समोर आहे. डॉ. विश्वास मेहंदळे आणि किरण चित्रे यांनी सांगितल्या प्रमाने हल्लीचा मीडिया कसा फास्ट फोर्वार्ड्स होत चालला आहे आणि कसा जहिरातिंच्या मागे लागला आहे. कसा आपली संस्कृति विसरून जहिरातिच्या मागे लागला आहे ते पटवून दिले आणि सह्याद्रिने नुसते जहिरातिच्या मागे न लागुन दुसर्या न्यूज़ चेन्नल कडून चांगले घेवुन त्याचे अनुकरण न करता कसे स्वताला पुढे नेले पाहिजे हे सांगितले. तसेच ह्या प्रोग्राम मध्ये तब्बसुम गोविल यांना फ़ोन करून त्यानी सर्व आपल्या सहकर्यंशी आपली  आठवण  शेअर  करताना त्यानी एक शाहिरी केली ती अशी 

"जो बीत गए है वो जमाने नहीं आते
जो बीत गए है वो जमाने नहीं आते
आते है नए लोग लेकिन पुराने नहीं आते!!! "

अश्याप्रकारे त्यानी आपली आठवण सांगितली. तसेच ह्या कार्यक्रमात सुहासिनी मुळगावकर ह्यांची एक क्लिप दाख्वान्यत आली आणि त्यांची आठवण दाखवण्यात आली.

                                                                                                              
                                                                                                                   ni3more

Tuesday, October 9, 2012

प्रेमकविता - जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!       

                                 
                                                                             

                                                            रात्र होती अशी 
                                                           आहे साक्ष तिची 
                                                           होती जवळी म्हणून 
                                                           जीव होता मुठी 
                                                            ध्यास लागी जीवा 
                                                            छंद होता तुझा 
                                                   जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!! 
                                           
                                                  आत होता तुझ्या भावनाचा सडा
                                                          तू सांगणार कश्या 
                                                        तुझ्या भावनांचा सडा 
                                                          मी नव्हतो जेव्हा 
                                                           तुझपाशी जेव्हा  
                                               राहिलीस कशी माझ्या वाचून जीवा 
                                                       म्हणून छंद होता मला 
                                               जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

                                               मी होतो जेव्हा ऑफिसात तुझ्या 
                                                      जीव होता तुझा तेव्हा  
                                                मी होतो तेव्हा ऑफिसात तुझ्या 
                                                     तेव्हा पासून तु साठवून
                                                     ठेवला आठवणीचा सडा 
                                                मी अचानक सोडून गेलो जेव्हा 
                                                   याद आली माझी तुला 
                                                     जवळ नव्हतो तेव्हा 
                                                        याद आली तुला 
                                               जीवनाशी असा मार्ग आहे तुझा !!!
                                                          छंद होता तुझा 
                                                         याद आली तुला 
                                             जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

                                                                                                                        
                                                                                                                 Created By 
                                                                                                                   ni3more