Total Pageviews

Friday, October 12, 2012

वाटचाल सह्याद्रीची १९७२ ते २०१२

आपल्याला सर्वाना अगदी परिचयाचे असलेला सहयाद्री वरील लोकमानस हा कार्यक्रम नेहमीच 
वेगवेगळ्या विषयावर आपले कार्यक्रम सादर करीत असतो. मी वेब जर्नलिज़म हा कोर्स करीत असल्याने मला ह्या कार्यक्रमा मध्ये जाण्याचे भाग्य लाभले नवीन अनुभव मिळेल म्हणून मी कार्यक्रमाला गेलो होतो. 
२ ऑक्टोबर २०१२ सह्याद्री वाहिनीला चाळीस वर्ष पूर्ण झाली ह्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०१२ रोजी सह्याद्री लोकमानस ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक जयू भाटकर ह्यांनी १९७२ ते २०१२ सह्याद्रीची वाटचाल हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने पत्रकारितेशी संबधित असणार्या मुला मुलीना बोलावण्यात आले होते. गेले चाळीस वर्ष काम करून निवृत्त झालेल्या आजी माजी कर्मचार्यांना ह्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून 
बोलावले होते. त्यात ज्येष्ट दूरदर्शन अधिकारी डॉ. विश्वास मेहंदळे, याकुब सईद, विनायक चासकर, अशोक दुबे, रविवारचे राजे म्हणून प्रसिद्ध असणारे अरविंद मर्चंड, गुंडाप्पा विश्वनाथ, चिमणराव  अश्या एकामागोमाग प्रसिद्ध कार्यक्रम देणाऱ्या विजया धुमाळे त्या आल्या होत्या. त्याच बरोबर अभियांत्रिक  क्षेत्रातले डी.स.ल प्रसाद, के न सोमनाथ, नीना राऊत, महाराष्ट्राची लोकधारा सारखा प्रसिद्ध कार्यक्रम देणाऱ्या किरण चित्रे, तसेच तुम्हाला आम्हांला अगदी परिचयाचे असणारे सुप्रसिद्ध निवेदक प्रदीप भेंडे, सुधीर गंडगीळ, आणि देवेंद्र भुजबल तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातले आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निवेदिका ह्या समीर जोशी ह्या होत्या. निवेदिका समीर जोशी ह्यांचे सूत्रसंचालन हे तर अवर्णनीय आणि सुंदर होते.  
          डॉ.विश्वास मेहंदळे यांनी आपली आठवण सांगताना त्यांनी  सुभाषिताचा आधार घेऊन आपल्या भावना प्रकट केल्या ते बोलत होते कि नवीन माध्यमांमध्ये काम करताना अनुभव हा भारत दुर्लभे जन्म महाराष्ट्र अति दुर्लभ आमन्त्राम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनवश्यं अयोग्य पुरुष नास्ती. याकूब सईद यांनी पहिल्याच दिवशी पहिला कार्यक्रम कसा आठ मिनिट उशिरा सुरु झाला आणि एक आशा पारेख यांची एक मस्त आठवण सांगून कार्यक्रमामध्ये अजून रंगत आणून दिली. अशोक यांनी सांगितले कि निर्माता म्हणून आम्ही कलाकारांना मोठे केले नाही तर कलाकारांनी दूरदर्शन ला मोठे केले. तसेच त्यादरम्यान सुधीर गंडगीळ यांनी याकूब जिना टाकलेली गुगली ती अशी ह्या कार्यक्रमात बसले असताना तुम्ही तुमच्याच कार्यक्रमाची निर्मिती करीत असताना तुमच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलेले असेल का? बदलेल्या प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन ह्या गुगलीने कार्यक्रमात अजून रंगत आणून सोडली.
अरविंद मर्चंड यांनी हेमा मालिनीची आठवण सांगताना सांगितले आपण आता जसे सह्याद्री वाहिनीला चाळीस वर्ष पूर्ण झाले तसे त्यावेळेला सह्याद्री वाहिनी ला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती म्हणून आम्हाला दिल्लीवरून एक प्रोग्राम करायला सांगितला होता तर त्यावेळी आम्ही हेमा मालिनीला घेवून प्रोग्राम करायचा  ठरवला पण एक अडचण होती त्याकाळात हेमा मालिनी हि प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि आणि मानधन देणे काही परवडणारे नव्हते तर त्यांनी ठरवले कि आपण त्यांना आपला कार्यक्रम करण्यासाठी  विनंती करू आणि हेमा मालिनी बोलल्या  दूरदर्शन हे माध्यम एवढे मोठे आहे आणि आम्हा कलाकारांना मोठे करण्या मागे  त्यांचे हाथ मोठे आहेत  म्हणून  मी मानधन न घेता  कार्यक्रमा मधे सहभागी होईल. तसेच प्रदीप भिडे यांनी मुक्त बर्वे यांनी त्यांना वृत्त वाचनाची संधी कशी दिली आणि त्यांनी १९९३ बॉम्ब  ब्लास्ट  झाले असताना मजलदरमजल करत कसे सह्याद्री मध्ये पोहचले आणि कश्या दोन दिवस बातम्या सांगितल्या त्याचा थरारक  अनुभव सर्वांशी शेअर केला. सुधीर गांडगीळ यांनी सर्व अभियांत्रिक अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली तसेच एक किस्सा सांगताना त्यांनी बाळासाहेब यांच्या एका किस्स्याची आठवण सांगताना सांगितले कि बाळासाहेब आणि व.पु.काळे पंचविशीच्या कार्यक्रमाला आले असताना बाळासाहेब बोलले व पु काळे आणि मी एकाच कॉलोनीत राहत असल्याने दोघांना एकत्र बोलावले आहे का.तसेच सुधीर गांडगीळ यांनी असे  मनोरंजन केले अश्या प्रकारे एक एक किस्से आठवणी कार्यक्रम चालू असताना रंगत गेले. हा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यामागे कारण म्हणजे तेथील टेक्निकल स्टाफ आणि कॅमरमन यांनी त्यावर घेतलेली मेहनत दिसली आणि कार्यक्रम कसा करावा हे सह्याद्री कडून इतर वहिन्यानी शिकले पाहिजे. सह्याद्री हे एक उत्तम उदहारण आजच्या वहिनीच्या समोर आहे. डॉ. विश्वास मेहंदळे आणि किरण चित्रे यांनी सांगितल्या प्रमाने हल्लीचा मीडिया कसा फास्ट फोर्वार्ड्स होत चालला आहे आणि कसा जहिरातिंच्या मागे लागला आहे. कसा आपली संस्कृति विसरून जहिरातिच्या मागे लागला आहे ते पटवून दिले आणि सह्याद्रिने नुसते जहिरातिच्या मागे न लागुन दुसर्या न्यूज़ चेन्नल कडून चांगले घेवुन त्याचे अनुकरण न करता कसे स्वताला पुढे नेले पाहिजे हे सांगितले. तसेच ह्या प्रोग्राम मध्ये तब्बसुम गोविल यांना फ़ोन करून त्यानी सर्व आपल्या सहकर्यंशी आपली  आठवण  शेअर  करताना त्यानी एक शाहिरी केली ती अशी 

"जो बीत गए है वो जमाने नहीं आते
जो बीत गए है वो जमाने नहीं आते
आते है नए लोग लेकिन पुराने नहीं आते!!! "

अश्याप्रकारे त्यानी आपली आठवण सांगितली. तसेच ह्या कार्यक्रमात सुहासिनी मुळगावकर ह्यांची एक क्लिप दाख्वान्यत आली आणि त्यांची आठवण दाखवण्यात आली.

                                                                                                              
                                                                                                                   ni3more

Tuesday, October 9, 2012

प्रेमकविता - जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!       

                                 
                                                                             

                                                            रात्र होती अशी 
                                                           आहे साक्ष तिची 
                                                           होती जवळी म्हणून 
                                                           जीव होता मुठी 
                                                            ध्यास लागी जीवा 
                                                            छंद होता तुझा 
                                                   जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!! 
                                           
                                                  आत होता तुझ्या भावनाचा सडा
                                                          तू सांगणार कश्या 
                                                        तुझ्या भावनांचा सडा 
                                                          मी नव्हतो जेव्हा 
                                                           तुझपाशी जेव्हा  
                                               राहिलीस कशी माझ्या वाचून जीवा 
                                                       म्हणून छंद होता मला 
                                               जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

                                               मी होतो जेव्हा ऑफिसात तुझ्या 
                                                      जीव होता तुझा तेव्हा  
                                                मी होतो तेव्हा ऑफिसात तुझ्या 
                                                     तेव्हा पासून तु साठवून
                                                     ठेवला आठवणीचा सडा 
                                                मी अचानक सोडून गेलो जेव्हा 
                                                   याद आली माझी तुला 
                                                     जवळ नव्हतो तेव्हा 
                                                        याद आली तुला 
                                               जीवनाशी असा मार्ग आहे तुझा !!!
                                                          छंद होता तुझा 
                                                         याद आली तुला 
                                             जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

                                                                                                                        
                                                                                                                 Created By 
                                                                                                                   ni3more
                                                    

Monday, October 8, 2012

दुष्काळ संपला







तब्बल ३३ वर्षांनी वेस्ट इंडीजने इतिहास घडवला.तब्बल ३३ वर्षा आधी विवियन रिचर्डस, ग्रीनीज,होल्डिंग्स यांच्या कारकिर्दीत वेस्ट इंडीजने वर्ल्ड कप  जिंकला होता.त्यानंतर वेस्ट इंडीजला कोणाची न कोणाची नजर लागली क्रिकेट  वेस्ट इंडीज क्रिकेट तळागाळाला गेला.जशी एकाद्या उंदरावर मांजर झडप घालून कशी शिकार करते अगदी तशीच  क्रिकेट मध्ये सर्व संघ वेस्ट इंडीजवर हवी झाले होते काही वर्ष.त्यानंतर वेस्ट इंडीजने क्रिकेटने कधी डोके वर  काढून कधी पहिलेच नाही.तब्बल ३३ वर्षाने डेरेन सॅमी च्या नेतृत्वाखाली पहिला वाहिला टी २० विश्व चषकावर आपले नाव कोरले आणि एक हाती वेस्ट इंडीज क्रिकेट मधला दुष्काळ संपला. तब्बल १ वर्ष बाहेर असणाऱ्या गेल ला वेस्ट इंडीज क्रिकेट संघात सामील करून घेण्याची बुद्धी वेस्ट इंडीज बोर्डाला आली आणि त्यांनी त्याला आपल्या वेस्ट इंडीज संघ मध्ये खेळवले आणि गेल समोर असला तर भल्या भल्या बोलर ला हृदयात धडकी भरते.अगदी झाले तसेच सेंमीफायनल मध्ये पहिली फलंदाजी करून २०५ रन्स केले आणि ऑस्ट्रेलिया संघाला त्यांनी बाहेर चा रस्ता दाखवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.वेस्ट इंडीज ने नाणेफेक जिंकल्यावर वेस्ट इंडीज परत ऑस्ट्रेलिया सारखा चमत्कार करून दाखवेल.वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल वि. श्रीलंकेचा संघ अशी ही लढत होती असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये.पण गेल आणि चार्ल्स लवकर आऊट झाल्यानी विंडीज ची हवा गुल केली श्रीलंकन गोलंदाजांनी.याच मैदानात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने विक्रमी २०५ धावा केल्या होत्या. काल ते ६ विकेटस् गमावून १३७ धावा करू शकले. एका ‘स्टेज’ला इतक्या कमी धावा झाल्या होत्या की याच गतीने ते खेळत राहिले तर २० षटकांच्या अखेरीस त्यांची धावसंख्या ४६ असेल असे टीव्हीवरचा कॉमेण्टेटर विनोदाने म्हणाला.
इतर फलंदाज भानामती झाल्यागत विकेटवर वावरत असताना तिकडे दुसर्‍या बाजूने सॅम्युएल्स मारत सुटला होता. संघाच्या पहिल्या ५० धावा निघायला ७५ चेंडू लागले, तर सॅम्युएल्सच्या दणक्यामुळे पुढील धावांचे अर्धशतक २६ चेंडूंत निघाले. एवढी वाताहत होऊनही विंडीज अखेर १५० धावा करणार असं वाटत असताना सॅम्युएल्स बाद झाला. त्यानंतर १३७ धावांवर विंडीजला रोखण्यात श्रीलंकेला यश आले. सॅम्युएल्सने ५६ चेंडूंत ७८ धावा केल्या. त्याच्या या खेळीचं महत्त्व वेगळं सांगायला नकोे. मलिंगाच्या ३ षटकांत ४४ धावा निघाल्या. तुलनेत इतरांची आकडेवारी बघा. मेंडिस - १४ धावांत ४ बळी, धनंजय - १६ धावांत १ बळी, मॅथ्यूज - ११ धावांत १ बळी.

वेस्ट इंडीजचा डाव कुंथत चालू असताना व तो संपल्यावरही ते वर्ल्ड कप जिंकतील असं चुकूनही वाटत नव्हतं. आपण त्यांच्या ‘गँगनाम’ नाचाला मुकणार असं वाटत होतं. ब्राव्होच्या वाढदिवशी विंडीजचा पराभव होणार अशीच लक्षणं दिसत होती. 
पण काय घडलं? वेस्ट इंडीज चक्क जिंकले. दबावाखाली श्रीलंका कोलमडली. पावसाची शक्यता दिसू लागल्यावर ‘डकवर्थ-लुईस’ सिस्टीमचे नियम लागू होतील व त्यात आपण हरू या भीतीने श्रीलंकेच्या खेळाडूंना ग्रासलेले दिसले. संपूर्ण स्पर्धेत सातत्याने ‘रिव्हर्स स्वीप’ मारणारा जयवर्धने नेमका त्याच फटक्यावर बाद झाला. दिलशानची उजवी यष्टी उखडून टाकून रामपॉलने विंडीजला उत्तम सुरुवात करून दिली. जयवर्धने व संगक्कारा विकेटवर होते तोवर श्रीलंकेचा विजय निश्‍चित वाटत होता. पुढे वाट लागली. तरीही वेस्ट इंडीजची धावसंख्या कमी असल्याने श्रीलंकेच्या ८४ धावांत ७ विकेट गेल्यावरही विजय कोणाचाही होऊ शकेल असेच वाटत होते. रामपॉलच्या एका षटकात कुलशेखराने २२ धावा बदडल्या. श्रीलंका सहजासहजी हार मानायला तयार नव्हती. पण ते सोपं नव्हतं व अखेर त्यांचा ३६ धावांनी पराभव झाला. श्रीलंकेसाठी अजंठा मेंडिसने केली तशीच मारक फिरकी गोलंदाजी विंडीजसाठी नारायणने केली. खरोखरच विंडीज संघ एकजुटीने व पेटून उठल्यासारखा खेळला. विजयानंतर सगळ्या संघाने केलेला ‘गँगनाम’ नाच पाहताना मनाला आनंद होत होता. ख्रिस गेल बॅटीचा चमत्कार दाखवू शकला नाही तरी सामना संपल्यावर त्याने आपल्याला अवगत असलेले सगळे नाच करून दाखवले. वेस्ट इंडीजच्या क्रिकेट इतिहासात हा विजय सुवर्ण अक्षराने नोंदला जाईल. (सामनामधून).



ट्वेण्टी - २० वर्ल्ड कप धावफलक
वेस्ट इंडीज-श्रीलंका अंतिम सामना 
निकाल : वेस्ट इंडीज ३६ धावांनी विजयी

वेस्ट इंडीज धावा चेंडू ४ ६
चार्लेस झे. कुलशेखरा गो. मॅथ्यूज ० ५ ० ०
गेल पायचीत गो. मेंडिस ३ १६ ० ०
सॅम्युअल्स झे. मेंडिस गो. धनंजया ७८ ५६ ३ ६
ब्रााव्हो पायचीत गो. मेंडिस १९ १९ ० १
पोलार्ड झे. धनंजया गो. मेंडिस २ ४ ० ०
रस्सेल पायचीत गो. मेंडिस ० १ ० ०
सॅमी नाबाद २६ १५ ३ ०
रामदिन नाबाद ४ ४ ० ०
अवांतर : ५ (लेगबाइज २, वाइड ३)
एकूण : २० षटकांत ६ बाद १३७
गोलंदाजी - मॅथ्यूज ४-१-११-१, कुलशेखरा ३-०-२२-०, मलिंगा ४-०-५४-०,
मेंडिस ४-०-१२-४, धनंजया ३-०-१६-१
श्रीलंका (लक्ष्य १३८ धावा) धावा चेंडू ४ ६
जयवर्धने झे. सॅमी गो. नरिन ३३ ३६ २ ०
दिलशान त्रि. गो. रामपॉल ० ३ ० ०
संगक्कारा झे. पोलार्ड गो. बद्री २२ २६ २ ०
मॅथ्युज त्रि. गो. सॅमी १ ५ ० ०
जीवन मेंडिस धावचीत (ब्राव्हो/नरिन) ३ ३ ० ०
परेरा धावचीत (रामदिन) ३ ५ ० ०
थिरिमने झे. चार्लेस गो. सॅमी ४ ७ ० ०
कुलशेखरा झे. बद्री गो. नरिन २६ १३ ३ १
मलिंगा झे. ब्राव्हो गो. नरिन ५ १३ ० ०
मेंडिस झे. ब्राव्हो गो. सॅम्युअल्स १ २ ० ०
धनंजया नाबाद ० ० ० ०
एकूण : १८.४ षटकांत सर्व बाद १०१
गोलंदाजी - बद्री ४-०-२४-१, रामपॉल ३-०-३१-१, सॅम्युअल्स ४-०-१५-१,
नरिन ३.४-०-९-३, सॅमी २-०-६-२.

                                                                                                                  -ni3more

Wednesday, October 3, 2012

निसर्ग....

मन उधान वार्याचे 

मन उधान वार्याचे 

मन उधान वार्याचे 

मनमोकळे जगणे 

मनमोकळे जगणे 





माझे गाव

माझे गाव







कॅमे-यातून .. टिपलेले छायाचित्र.

घरगुती गणपती

माझ्या घरचा गौरी गणपती

मामाच्या घरचा गणपती

Fashion Street cha ganpati 



एक इंचाचा गणपती

 घरगुती गणपती











































अंधेरीचा राजा