Total Pageviews

Monday, January 28, 2013

किल्ले वसई


                                                                     किल्ले वसई
                आपल्या वसईला म्हणजे शूर्पारक नगरीला पौराणिक काळापासून ते ब्रिटीश काळापासून असा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
उत्तरेकडे वैतरणा दक्षिणेला उल्हास नदी तसेच पूर्वेला तुंग पर्वत व पश्चिमेला विशाल समुद्र ह्यामुळे वसईला भौगोलिक दृष्टीने खूपच महत्व प्राप्त झाले होते.
अनेक तीर्थक्षेत्र , तलाव, बावखले ह्यांनी वसईची जमीन खूपच सुपीक होती. आशियातील सर्वोत्तम प्रतीची साखर आपल्या वसई मध्ये बनत असे.
शूर्पारक बंदरातून अखाती देशांशी इथे मिळणारे मसाले, साखर ह्या सारख्या अनेक उत्पादनांचा व्यापार चालत असे. बोट बांधणी साठी शूर्पारक फारच प्रसिद्ध होते.
किंबहुना म्हणूनच अनेक परकीय आक्रमण इथे झाली. ई.स. १५१५ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी ह्या भूमीत पाऊल ठेवले त्यानंतर ई.स. १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांनी तीन वर्षे झुंज देऊन पोर्तुगीजांना परास्त केले व वसई परकीय सत्तेपासून मुक्त केली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर पारंपारिक शास्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा होता.
युरोपीय सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसई मध्ये झाला ह्याचा वसई करांना सार्थ अभिमान वाटायला हवा. परंतु ह्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा आपला वसईचा किल्ला, अनेक महत्वाचा ऐतिहासिक वास्तू मात्र उपेक्षित अवस्थेत आहेत.


                                                             ( चिमाजी अप्पा स्मारक )
तीन वर्षे राज्य वसवून मोर्चे बसवून सभोवती धमामी..
सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी..
हल्ल्यात उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी...
नऊ लक्ष बांगडी फुटली हो !! वसई मुव्कामी
सन १५५६ च्या दरम्यान वसई मध्ये पोतुगीज तोफांचा आवाज प्रथम कडाडला. त्यानंतर पोतुगीजांनी सन १५३४ मध्ये प्रथम बाले किल्ला व नंतर सध्या दिसत असलेल्या किल्ल्याच्या भव्य परिसरात एक सुसज्ज शहर वसवून तब्बल २०५ वर्षे वसईवर राज्य केले. पोतुगीजांच्या राजवटीत वसई मधील धार्मिक, राजकीय अन सामाजिक वातावरण ढवळून निघाले. पोतुगिजांकडून र-थानिकांवर अनेक जुलूम , धार्मिक छळ, अत्याचार झाले. अजूरकर नाईक आणि अंताजी कावळे ह्यां र-थानिक वतनदारांनी आपल्याला र-वराज्यात सामावून घेण्यासाठी पेशव्यांकडे साद घातली आणि त्याची परिणती म्हणून नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम हाती घेतली. सन १७३७ ते १७३९ तीन वर्षे मराठी सैन्याने शौर्याची शिकस्त करुन वैशाख वद्य द्वितीयेस (१६ मे १७३९) वसई किल्लावर विजयीची पताका फडकावली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज  असलेल्या पोतुगीजांवर पारंपारिक शस्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा आहे.
युरोप सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसईमध्ये झाला हा सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद  आहे....

पुराणप्रसिद्ध श्री नागेश्र्वर मंदिर 
तेराव्या शतकात सदर मंदिराचा परिसर नागेश महातीर्थ या नावाने प्रचलित होता. इ.स. १७४० मध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या अकाली मृत्यु नंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या मंदिरेचा जीर्णोद्धार करण्यात आला. आजही अनेक धार्मिक कार्यक्रम ह्या मंदिरात होत असतात.
           

                                                
                                                          ( पुराणप्रसिद्ध श्री नागेश्र्वर मंदिर )                              


  • बालेकिल्ला 
१४ व्या शतकात आरंभी शेषवंशी क्षत्रिय घराण्यातील नाथाराव भंडारी भोगळे ह्याने नागेश्र्वर तीर्थजवळ गढी उभारली. १५३० मध्ये गुरजातच्या बहादुरशहाचा सुभेदार मलिक तुघान हयाने हया किल्लावर प्रथम वर्चर-व प्रर-थापित केले. त्यानंतर १५३५ च्या दरम्यान "नुनो दा कुन्हा" या पोतुगीज गव्हर्नरच्या हुकुमावरुन पहिला कप्तान "गार्सिया दिसा" हयांनी हा किल्ला बांधला.
                                     
                                                               ( बालेकिल्ला )



  • जिवनदायी ख्रिर-तमाता मंदिर

बालेकिल्याच्या उत्तर तटाला लागूनच हे चर्च आहे. पोतुगीज भाषेत हया चर्चचे नाव "नोसा-सिन्होरा-द-विदा" असे आहे. हया चर्चची उभारणी इ.स. १५३६ च्या दरम्यान करण्यात आली. पोतुगीज काळात गॅरीझन चर्च हया नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिशांनी १८५२ मध्ये हया वार-तुचा वापर साखर कारखान्यासाठी केला. प्रवेशव्दाराजवळ कॉरेन्थियन पद्धतीचे खांब आहेत. तसेच आत वेदीवरचे अर्धवर्तुळाकार छत हे हया वार-तुचे वैशिष्टय आहे.                                       
                                                                    

                                                   
                                        


  • टाऊन हॉल (कमारा) म्हणजेच नगरपालिकेची इमारत.
पोतुगीज कालीन शासकीय कामासाठी वापरात असलेली देखणी वार-तु. इ.स. १६०६ च्या दरम्यान ही वार-तु उभारली. बालेकिल्ल्याच्या आसपास पोतुगीज सरदारांनी मोठमोठे वाडे बांधल्यामुळे वसई किल्ल्यात आधुनिक नगरी निर्माण झाली. नगरपालिकेला लागुनच "मिझेरी कॉर्दिया" म्हणजेच रुग्णालय व कारागृह आहे.

                                       
                                     
                                                                          
                                                                     टाऊन हॉल




                                                  
                                                   


  • संत जोजेफ ख्रिर-त मंदिर

इ.स. १५४६ हे चर्च उभारले गेले. वसई किल्ल्यातील सर्वात उंच ख्रिस्ती मंदिर म्हणुन ही वार-तु प्रसिद्घ आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक मनोरा असुन त्यावर एक चक्री जिनाही आहे. मनोर-यावर चार रांजणाकृती कळस होते. मंदिरात सुरुवातीला दोन मनोरे होते त्यातील ऐक शिल्लक आहे. त्याला चक्रीमाडी जिना आहे. गोव्याचे बिशप यामध्ये वार-तव करत असे. इ.स. १५४६ ते १६०० साली हे चर्च उभारले गेले. यात चार कळस होते. आता तीन कळस शिल्लक आहेत. अगदी नगरपरिषदेच्या मागल्या बाजुस ऐक मोठी बाजारपेठेची जागा होती तिथे धान्यापासून ते दारुगोळा पर्यत सर्व वर-तू मिळत असे. हया किल्ल्याचे बांधकाम आर सी सी कस्ट्रकशन पद्धतीचे नसून प्रत्येक पायरी मोकळी आणि बाजुच्या भितींमध्ये अडवलेली आहे.तीन पर-यांचे चित्रे, केळीचा बुधां, फुलांचा रस यातून रंग संगती केली आहे. तब्बल १२०० वर्षे राहिलेली आहे. यात १५ भुरुज होते आता फव-त ऐक शिल्लक आहे.हनुमान मंदिराच्या समोर पडीक वार-तू आहे. तिथे बाजारपेठ होती. चिमाजी अप्पांनी हयातील बांधलेले पहिले मंदिर मिशीवाला मारुतिला कमरेला खंजिर आहे. चर्चच्या मागे वखार होती तेथे लागणारे साहित्य ठेवले जात असे. हयाच मंदिराच्या बाजुला लक्ष्मण भुरुज सागरी दरवाजा आहे.हा भुरुज ४-५ फुट उंच आहे. हया गंधक, शिरुर टाकून बांधकाम केले आहे. शत्रू जेव्हा किल्ल्यामध्ये प्रवेश करेल तेव्हा आपण गाफिल रहावे शत्रूची चूकामूक होण्यासाठी असे वेडेवाकडे दरवाजे बनवण्यात आले. वसई किल्लया मध्ये युद्ध झाले तेव्हा ऐकही हत्ती, उंट नव्हते फव-त घोडदळ होती. हत्तींनी वसई किल्ल्याचा  समुद्रीदरवाजा हि अफवा होती.


                                           
                                                        


  • गोन्सालो गार्सिया ख्रिस्त मंदिर
इ.स. १५४४ दरम्यान या चर्चच्या प्रवेशद्वराशी कॉरेन्थियन पद्धतीचे दगडी खांब आहेत तसेच वरच्या भागात सुर्य व चंद्र यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. कोरल्या आहेत. इ.स. १५५८ मध्ये या चर्चची पुर्नबांधणी करण्यात आली. यालाच लागुन महाविद्यालयाची वास्तु आहे.गोन्सालो गार्सिया भारतामध्ये आले होते. गव्याचे बिशप आणि व्हाईसरॉय याच्यां उपस्थितीत वेलबुट्टीचे नक्षी, शंकर पार्वती, भारतीय आणि रोम पद्धतीने १० फुट रुंद २२ फुट अर्धगोलाकार अश्या या महाविदयालयाचे बांधकाम १५६० मध्ये करण्यात आले.ख्रिस्ती धर्मांची दिक्षा देण्यासाठी या महाविदयालयाची स्थापना करण्यात आली.त्यावेळी परशुराम शास्त्री या पंडिताचे धर्मांतर करण्यात आले आणि हेगंरी डिसुजा हे नाव त्याले देण्यात आले.  
                                                                         
                                                     



  • हॉस्पिटल

इ.स. १६४९ मध्ये ६८ हजार रईस (त्यावेळचे चलन) खर्च वार्षिक मदत मिळायची ती मदत पोर्तुगीजांनी बंद केल्या मुले हे हॉस्पिटल दीड ते दोन वर्षात बंद झाले. इ.स. १६४९ मध्ये ६८ हजार रईस (त्यावेळचे चलन) खर्च वार्षिक मदत मिळायची ती मदत पोर्तुगीजांनी बंद केल्या मुले हे हॉस्पिटल दीड ते दोन वर्षात बंद झाले.


                                               
                                               

  • फ्रान्सिस्कन ख्रिस्त मंदिर 
इ.स. १५५७ मध्ये हया चर्चची बांधणी करण्यात आली. १५ मे १७३९ रोजी पोतुगीज कप्तान डिसोजा परेरा याने पोतुगीज अधिकाऱ्यांची येथे सभा घेऊन मराठ्यांना शरण येण्यामध्ये बारा कलमी तहाची ऐतिहासिक बैठक याच चर्चमध्ये झाली.
 

                                                 
                                              ( बारा कलमी तहाची ऐतिहासिक बैठक येथे झाली )


या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तब्बल २४०० परदेशी नागरीक, १८०० गुलाम, २०० .युरोपीय नागरीक वापरण्यात आले.हा सर्वात जुना किल्ला आहे. हे सुसज्ज शहर म्हणून त्यावेळेला घोषित करण्यात आले. आणि त्याबाजुला लोक वार-तव्य करु लागली. येथे ऐक ताधांले तलाव आहे.आणि येथे शभंर च्या वरती गोडया पाण्याच्या विहीरी आहेत.येथे उत्खन्न करताना वेगवेगळी शस्त्रात्रे सापडली. येथील बांधकाम हे पूर्णता दगडाचे आहे. येथे सर्वात पहिले बांधलेले पोतुगीज चिन्ह आहे. त्याला राज चिन्ह असे म्हणतात.या किल्ल्यात शिरल्यावर पहिला दरवाजा आहे तिथे सर्वात पहिले राज चिन्ह बनवले आहे.
इ.स. १५१५ मध्ये पोर्तुगीज आले. आणि अरबी लोकांवर विजय संपादन करून त्यावेळी त्या त्या अधिकार्यांना वतन दिली हे सर्व मॅनेज करण्यासाठी नगरपालिका बांधली. व्हाईसरॉय यांनी त्याकाळी हे अत्याधुनिक सहकार म्हणून घोषित केले.  चर्चच्या आतमध्ये थडगे असणारे हे एकच चर्च आहे. हे फ्रान्सिसकन पंथातील चर्च आहे. इ.स १५३९ मध्ये चिमाजी अप्पांनी ह्या किल्ल्यावर आक्रमण करून बुरुज फोडला आणि सतत तीन वर्ष आक्रमण करून ह्या चर्च मधला कॅप्टन फ्रान्सीस डिसिल्वा अक्षरश: मराठ्यांची आक्रमांची शिकस्त पाहून हैराण झाला आणि शेवटी चिमाजी अप्पाना शरण आला आणि १२ पानाचा तह झाला तो याच चर्च मध्ये झाला आणि युद्धाला विराम दिला.

                                 

                                                           नगरपरिषद



 
                                                   
                                                                     शिलालेख

                                                            ( लक्ष्मण भुरुज दरवाजा )





                              आम्ही किल्ल्याला व्हिजीट दिली तेव्हा उत्खननाचे काम चालू होते


नितिन मोरे 

No comments: